१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस, भारतभर त्याना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करतो! उत्सवप्रिय भारतात येथील संस्कृतीने माणूसपण नाकारले, जे बाबासाहेबांच्या सघर्षाने मिळाले म्हणून इथला शोषित वर्ग हर्षउल्ल्हासाने जयंती साजरी करित आला आहे..
या जयंतीचा नीटसा अभ्यास केल्यास आढळून येते कि, गेल्या ७ दशकात जयंतीचे स्वरुप निरनिराळ्या पद्धतीने बदलत गेले, जसा देश अत्याधुनिक झाला तसे जयंती सुद्धा अत्याधुनिक झालीये… पण काही गोष्टीत थोडासा बदल हवा आहे म्हणून मी इथे काही नमूद करेन..
१) बाबासाहेबांचा AI फोटो Flex किंवा होडींगवर वर लावू नये व इतर कलाकार ज्यानी बाबासाहेबांची भूमिका केली त्यांचेही फोटो लावू नये. Ai फोटो face बिघडण्याची शक्यता असते. फोटो जर मॅच होत असेल तर AI वापरता येईल.
२) सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने बॉलिवूडचे नाच-गाणे ठेवणे अयोग्य आहे. आपली बौद्ध संस्कृती या पेक्षा फार निराळी आहे, वैचारिक चर्चा, लेण्यांवरील स्थापत्यकला, चित्रकला, वकृत्वस्पर्धा, रिल स्पर्धा सांस्कृतीक कार्यक्रमात बसतात बाकिच्या गोष्टी बाद करायची गरज आहे..
४) बरीच गाणी आहेत जी एक एक निवडून बाद करण्याची वेळ आली आहे, सर्वात वाईट म्हणजे लाईट गाणे त्या CD’s विंक्रिवर बंदी आणली पाहिजे. दोन्ही गाणे बोलणाऱ्याना तंबी दिली पाहिजे.. लाईट गाणे आणि कव्वाल्या आता बंद झाल्या पाहिजे..
५) अतिरिक्त साउंड सिस्टीम आणि LED. काही लोक Competition च्या नावाने अक्षरश: हैदोस माजवत आहे. जास्त डेसिबल आवाज वयस्कर किंवा ह्रदयाच्या रुग्णाना घातक ठरते. बरीच तरुण कोसळून मेली आहेत या अश्या प्रकरणात.. म्हणून तरुणानी गांभीर्याणे घेणे!
६) स्टीलच्या रॉडवर झेंडे मिरवणे थांबले पाहिजे, एखाद्या विजेच्या केबलमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आहेत म्हणून सावधगिरी नेहमी बेहत्तर व घाणेरड्या कृतीचा डांस डिजेवर उभे राहुन करण्याचे प्रकार ज्यात लहान मुल असतात हे नियम आखून रोखले पाहिजे..
७) तुम्ही जगातील दोन महत्वाच्या विद्वान व्यक्तींच प्रतिनिधित्व करत आहात पहिले बुद्ध आणि दुसरे बाबासाहेब म्हणून शिस्तप्रिय व ड्राय डे स्वरुपात मद्यपान घेणाऱ्यानी हा दिवस साजरा करावा अशी शपथ त्यांच्याकडून करुन घ्यावी! सोबत वर्गणीसाठी खिशे भरणाऱ्याना दम देउन त्यांच्याकडून पण शपथ वदवून घ्यावी !
८) आपल्या भौतिक प्रश्न आणि गरजांवर समाजाचे प्रबोधन होईल आणि काही फलश्रूत असे काहि हाती लागेल असे कार्यक्रम घेणे. आर्थिक साक्षरता, सामाजिक साक्षरता, उत्तम संवादाचे महत्व, इंग्रजी व्याकरण, नोकरीसंदर्भात मार्गदर्शन आणि शैक्षणिक गरजा यावर भर देणे आवश्यक आहे..
९) एप्रिल महिन्यात सम्राट अशोक जयंती व महात्मा फुले जयंती सुद्धा येते म्हणून त्यांच्या जीवनाचे महत्व सांगणारे निदान कार्यक्रम अरेज व्हावे!
भारतीय समाज उत्सवप्रिय आहे म्हणून नाचणे, जल्लोष करणे ठिक आहे. एक दिवस जल्लोष करावा पण Social responsibility लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला सामाजिक उत्सवात स्थान नव्हते तुम्ही आता सर्व करु शकता..
1) Pay back to society.
2) Educate, Agitate & Organise
3) Reconstruction of society
4) जनसामान्य वंचित घटकाना वेळोवेळी अत्याधुनिक Resources चे मार्गदर्शन
५) युवा पिढींचे प्रश्न घेउन चर्चा सम्मेलने
या गोष्टीवर लोकाना जागृत करणे गरजेचे आहे! तर १४ एप्रिलच असा दिवस आहे, तिथे आपण लोकाना एकत्रित पाहतो म्हणून त्याना वारंवार सामाजिक जाबाबदाऱ्या समजून दिल्या पाहिजे, ही जबाबदारी मुख्यत: अनुभवी वर्गाकडे येते व त्यांची साथ तरुणानी द्यावी.
आपण सर्वाना जयंतीच्या कामासाठी खूप खूप सदिच्छा!
जयभीम !!
राकेश उत्तम अढांगळे
२९ मार्च २०२६

