वसमत प्रतिनिधी मिलिंद आळणे
वसमत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे. प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी विचार मंच अध्यक्ष देविदास मंत्री हे होते. प्रमुख पाहुणे देवानंद सोनाळे हे होते.भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृती दिन आहे .याच दिवशी 1947 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली होती. आजच्या दिवशी आपण आपल्या राष्ट्रध्वज तिरंगा आदराने फडकतो आणि त्याबद्दल अभिमान अभिमान व्यक्त करतो. राष्ट्रध्वज स्वीकृती म्हणून स्वीकारले.
स्वीकृती 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने तिरंगा ध्वजाला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारले. स्वरूप तिरंग्यात तीन पट्टे आहेत. केसरी (वरचा) पांढरा मध्यभागी आणि हिरवा( खालचा) पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र आहे ज्याला अशोक चक्र म्हणतात. महत्व केशरी रंग त्याग आणि बलिदानाचा पांढरा रंग शांती आणि सत्याचा, तर हिरवा रंग समृद्धी आणि जीवनाचा द्योतक आहे. अशोकचक्र अशोक चक्र हे न्यायाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे .तिरंग्याचा अर्थ तिरंगा ध्वज भारताचा एकता अखंडता आणि सार्वभौमतेचे प्रतीक आहे.
यावेळी गायकवाड साहेब ढेंबरे साहेब बाळा खरे सर देवानंद सोनाळे प्रणव आळणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

