मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील शिये इथल्या मधुकर गणपती पाटील यांनी पोलीस पाटील मनीषा विजय सिसाळ यांना हाताशी धरून खोटा वारस दाखला तयार करून घेतलाय, अशी तक्रार त्यांचा पुतण्या अवधूत विष्णू पाटील आणि रघुनाथ गणपती पाटील यांनी करवीरचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी केली आहे. या प्रकरणी पोलीस पाटील मनीषा सिसाळ यांना पद मुक्त करावं तसंच महसूल आणि भूमिअभिलेखकडून सातबारा नोंद रद्द करावी, अशी मागणी अवधूत पाटील यांनी केली आहे.

